समर्थ रामदास स्वामी यांच्यात चातुर्य, कार्यक्षमता, संघटना, लोकसंग्रह, धैर्य, व्यवहारधर्मता आदी अनेक गुण होते, असे गुरुदेव शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी सांगितले आहे. या गुणांवर प्रकाश टाकीत समर्थ रामदासांचे चरित्र अभ्यंकर यांनी ‘समर्थ रामदास’मधून कथन केले आहे.
समर्थ रामदासांचे समर्थ चरित्र या प्रकरणात त्यांचे घराणे, बालपण, संगत्याग, प्रभू रामचंद्रांचा अनुग्रह, शिव-समर्थ भेट लोकशिक्षक समर्थ रामदास यामधून त्यांची माहिती, कार्य सांगितले आहे.
ग्रंथराज श्रीदासबोध या प्रकरणातून दासबोध काय आहे, त्याची रचना, वेगळेपणा यावर भाष्य केले आहे. मनाचे श्लोक, समर्थांचा राम, समर्थ व शिवाजी महाराज भेट, समर्थांनी शिकविलेला व्यवहार आणि व्यवस्थापन, ‘वारकरी’ समर्थमधून त्यांची विठ्ठल भक्ती कथन केली आहे. त्याचबरोबर रामदासी संप्रदाय, गीता आणि समर्थ वचनातील साम्य, तुकाराम -रामदास, एकनाथ - रामदास एकवाक्यता कशी आहे हे स्पष्ट केले आहे.
(हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉमवरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)